PM Narendra Modi On Badlapur Incident | महिलांच्या वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर पंतप्रधान मोदींकडून चिंता व्यक्त; म्हणाले – “दोषी कुणीही असो, सगळ्यांचा हिशोब व्हायलाच हवा”

जळगाव : PM Narendra Modi On Badlapur Incident | बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने (Badlapur School Girl Incident) महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासला गेला आहे. बदलापूर येथील घडलेल्या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. राज्यभरात सातत्याने महिलांवर होत असलेल्या अन्याय-अत्याचाराच्या घटनांविरोधात महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) आक्रमक पवित्रा घेतला. दरम्यान मविआ कडून २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची (Maharashtra Band) हाक देण्यात आली होती.
दरम्यान आज (दि.२५) पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत ११ लाख लखपती दिदींना प्रमाणपत्रं वाटली जाणार आहेत. यासाठी जळगावात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील व देशातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे विमानतळाबाहेर महाविकास आघाडीने निषेध आंदोलन केले.
या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला अत्याचारावर बोलणार का? याबाबत सर्वांचे लक्ष लागले होते. जळगाव येथील सभेत बोलताना महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर मोदींनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना आणि त्यांना मदत करणाऱ्यांना कडक इशारा दिला आहे.
मोदी म्हणाले, “मी पुन्हा एकदा देशातील प्रत्येक राजकीय पक्षाला आणि राज्य सरकारांना आवाहन करतो की, महिलांवरील हिंसा अक्षम्य पाप आहे. दोषी कुणीही असो, तो सुटता कामा नये. त्याला कोणत्याही स्वरुपाची मदत करणारे सुटता कामा नये”, असा इशारा मोदींनी दिला.
“रुग्णालये असो, शाळा असो, कार्यालये असो वा पोलीस प्रशासन, ज्या पातळीवर कामचुकारपणा होईल, त्या सगळ्यांचा हिशोब व्हायला हवा. वरपासून खालपर्यंत स्पष्ट मेसेज जायला पाहिजे. हे खूप अक्षम्य आहे. सरकार येतील आणि जातील.
पण, जीवनाची आणि महिलेच्या सन्मानाचे रक्षण,
हे समाज आणि सरकारच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे”, असे आवाहन मोदी यांनी केले.
“महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी आमचे सरकार सातत्याने कठोर कायदे करत आहे.
आज इतक्या मोठ्या संख्येने महिला आणि मुली आल्या आहेत. पूर्वी तक्रारी येत होती की, वेळेत एफआयआर, सुनावणी होत नाही.
विलंब होतो. अशा अडचणी आम्ही भारतीय न्याय संहितेतून दूर केल्या आहेत”, असे मोदी यांनी सांगितले. (PM Narendra Modi On Badlapur Incident)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
BJP On Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती;
टूलकिट पुन्हा चर्चत?, विविध राज्यातील नेत्यांना प्रचारकार्यात उतरवण्याचा निर्णय