Maharashtra Congress Leader On Modi Govt | ‘राज्यातल्या सत्तांतरानंतर केंद्रातील सरकार कोसळणार’, काँग्रेसच्या नेत्याचा दावा; म्हणाले – ‘वाजपेयी यांच्या 13 महिन्याच्या सरकारची पुनरावृत्ती…’

Prithviraj Chavan-PM Narendra Modi

गोंदिया : Maharashtra Congress Leader On Modi Govt | राज्यात आगामी विधानसभेला (Maharashtra Assembly Election 2024) घेऊन राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. दरम्यान इच्छुक उमेदवार उमेदवारी ज्या पक्षातून मिळू शकते त्या पक्षात पक्षांतर करताना दिसत आहेत. लोकसभेला राज्यात मतदारांनी महायुतीला नाकारलं. महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठे यश मिळाले. त्यामुळे विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढलेला आहे. निवडणुकीसाठी मविआ मधील तीनही पक्षांनी कंबर कसल्याचे पाहायला मिळतेय.

‘महाराष्ट्रात तुम्ही जर सत्तांतर केले हरियाणात सत्तांतर होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकार फार काळ टिकणार नाही. मोदी सरकारची खुर्ची डळमळीत झाली आहे’, असा दावा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केला आहे. गोपाळ अग्रवाल यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, निवडणूक झाल्यानंतर चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार सत्तेतून बाहेर पडतील आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या १३ महिन्याच्या सरकारची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आज अनेक प्रश्न आहेत, निवडणुकीत बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, संविधान बचाव हे सगळे मुद्दे एकच आहेत.

यातील एकही मुद्दा केंद्र सरकार आणि राज्यातील तिघाडी सरकारला सोडवता आलेला नाही म्हणूनच महाराष्ट्रातल्या तीन तिघाडी काम बिघाडी सरकारमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे, असं त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, पुढच्या काळात अनेकजण काँग्रेसमध्ये येण्याच्या मार्गावर आहेत.
दररोज एक एक नवीन कार्यक्रम होणार आहे. भाजपाचं खरं रुप पाहिलेले आता तिथे राहणार नाही.
आज काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला आल्यापासून त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नवचैतन्य भरलेले आहे.
नानाभाऊ पटेल यांना संपूर्ण पाठिंबा आणि आशीर्वाद देऊन काँग्रेसला स्फूर्ती आणली आहे.

लोकसभेला जनतेने महाविकास आघाडीला ६५ टक्के जागा दिल्या. ४८ पैकी ३१ जागा जिंकल्या.
आता त्यापेक्षाही जास्त जागा विधानसभेला मिळाल्याशिवाय राहणार नाही.
महायुतीत कोण राहील किंवा कोण जाईल हे मला माहिती नाही, पण महायुतीला १०० जागाही मिळणार नाहीत.

गेली १० वर्ष चालत आलेले भ्रष्ट सरकार उलथवून टाकण्यासाठी, महागाईवर नियंत्रण मिळवण्याकरता,
बेरोजगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही मोठ्या संख्येने इथं आलात,
असंही ते म्हणाले. (Maharashtra Congress Leader On Modi Govt)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Parking Charge On Pune Major Roads | शहरातील मुख्य रस्त्यांवर पार्किंग शुल्क घेण्याचा पालिकेकडून राज्यसरकारकडे प्रस्ताव; जाणून घ्या

Maj Gen Anurag Vij At Bhau Rangari Ganpati | मेजर जनरल अनुराग वीज यांनी घेतलं श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन (Videos)

You may have missed