Raj Thackeray | ‘साहित्यिकच राजकारण्यांना सुधारू शकतात’, राज ठाकरेंचे वक्तव्य; म्हणाले – ‘कोणी विदुषकासारखे चाळे करतेय, तर कोणी जाळ्यांवर उड्या मारतेय’

Raj-Thackeray

पुणे: Raj Thackeray | दिल्ली येथे होत असलेल्या आगामी ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते सोमवार (दि.७) सकाळी पार पडले. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी राजकारण्यांवर निशाणा साधला. ‘साहित्यिकांनी राजकारण्यांना योग्य दिशा देण्याचे काम करावे असे म्हणत साहित्यिकच राजकारण्यांना सुधारू शकतात’, असे म्हंटले आहे.

https://www.instagram.com/p/DA0CYlbiKVw

याप्रसंगी माजी संमेलनाध्यक्ष प्रा. सदानंद मोरे, श्रीपाल सबनीस, लक्ष्मीकांत देशमुख, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, सरहदचे संजय नहार, साहित्य महामंडळाचे प्रकाश पागे, सुनीताराजे पवार आदी उपस्थित होते.

https://www.instagram.com/p/DA0Fm32pWQa

राज ठाकरे म्हणाले, मी माझ्या आयुष्यातील सर्वात छोटे भाषण आज करणार आहे. साहित्यिकांसमोर आम्ही काय बोलावे? ज्यांचे आम्ही ऐकायचे त्यांना आम्ही काय बोलणार! मसापच्या सभागृहातील साहित्यिकांचे फोटोच सर्व सांगत आहेत की, महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा काय आहे. खरंतर मला कळत नाहीय की, माझी या ठिकाणी काय गरज असते.

https://www.instagram.com/p/DA0G–jCJSg

साहित्य वाढविण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज लागेल, त्यासाठी आम्ही आहोतच, अन्यथा आम्हाला या साहित्य संमेलनामध्ये ऐकायला बोलवावे, बोलायला बोलवू नये. पण काही वर्षांपासून मी साहित्यिक पाहत आलो आहे की, ज्यांच्यात मराठी बाणा होता. तो आता दिसत नाही. योग्य वेळी राजकारण्यांना ठणकावून सांगण्याची धमक, हिंमत काही वर्षांपूर्वी त्यांच्यात होती, ती आज मला कमी दिसत आहे.

https://www.instagram.com/p/DA0NS3KpNqB

आजचा महाराष्ट्राचा झालेला सर्व खेळ, महाराष्ट्राचे झालेले अधःपतन प्रचंड आहे. महाराष्ट्राची सर्कस झाली आहे. कोणी विदुषकासारखे चाळे करतेय, तर कोणी जाळ्यांवर उड्या मारतेय, खरंतर अशा राजकारण्यांना जाळ्यांशिवायच्या इमारतीवरून उड्या मारायला सांगायला हवे.

https://www.instagram.com/p/DA0QJTTJNPE

ते पुढे म्हणाले, राजकारण्यांचे कान धरून त्यांना समजावून सांगण्याचे कर्तव्य साहित्यिकांचे आहे. तुम्ही अधिकारवाणीने सांगू शकता. मग आम्ही बोललं तर ट्रोल केलं जातं असं म्हणाल, पण तुम्ही त्याचा विचार करू नका. मला पण ट्रोल केले जाते पण मी ते पाहात नाही, वाचत नाही. आपण आपलं काम करावं.

https://www.instagram.com/p/DA0Sw14CCf-

महाराष्ट्र देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आहे. पण आज महाराष्ट्राची राजकीय भाषा खालच्या स्तरावर गेली आहे. राजकारण्यांना समजावणारे कोणी नाही, ज्यांना महाराष्ट्रातील बुजुर्ग म्हणावे, तेच त्यांच्या नादी लागलेले आहेत. म्हणून साहित्यिक म्हणून हे काम तुमच्यावर आहे आणि तुम्ही एक मोठी साहित्य चळवळ उभारायला हवी.

https://www.instagram.com/p/DA0T7MBpTcR

ज्या प्रकारची भाषा राजकारणात येत आहे, ते पाहून आजची नवीन पिढी यालाच राजकारण समजत आहे. महाराष्ट्रात अधःपतन होण्याचे जे कारण आहे त्यात चॅनल प्रमुख आहेत. ते कोणी काहीही बोलले की, त्यांचे दाखवतात. त्यांनी ते थांबवले पाहिजे, असेही राज ठाकरे यांनी म्हंटले आहे.

https://www.instagram.com/p/DA0Rehsi0Sg/?img_index=1

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar On Dattatray Bharne | ‘इंदापूरातून एका सहकाऱ्याला खूप संधी दिली मात्र….’, शरद पवारांची दत्ता भरणेंवर जहरी टीका; म्हणाले – ‘बारामती अन् इंदापूरात मलिदा गँग…’

Jayant Patil On BJP Govt | हर्षवर्धन पाटलांच्या पक्ष प्रवेशाच्या मेळाव्यात जयंत पाटलांनी सगळंच काढलं; म्हणाले – ‘दिल्लीश्वरांकडून शरद पवारांना ईडीची नोटीस, नमवण्याचे आटोकाट प्रयत्न’

Pimpri Assembly Constituency | पिंपरी विधानसभेत लढण्यास इच्छुक; ‘या’ महिला नेत्याने घेतली शरद पवारांची भेट; पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

You may have missed