Avinash Godbole | गोडबोले यांच्या पुस्तकात पुण्यातील समाजकारण आणि राजकारणातल्या व्यक्तींचे नेमके चित्रण – अरविंद गोखले

पुणे : Avinash Godbole | अविनाश गोडबोले यांनी त्यांच्या चार दशकांच्या पत्रकारितेतील अनुभवावर आधारित ऐसी अक्षरे मेळविली हे जे पुस्तक लिहिले आहे, त्यात गेल्या चार दशकात पुण्यातील समाजकारण आणि राजकारणातील ज्या व्यक्तींशी त्यांचा संबंध आला त्यांचे नेमकेपणाने वर्णन केले आहे,असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले (Arvind Gokhale) यांनी केले.
https://www.instagram.com/p/DA0Fm32pWQa
या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा काल निवारासभागृहात गोखले यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की गोडबोले आणि माझी पत्रकारिता समांतर काळातली आहे, त्यामुळे मला त्यांनी यात केलेले लिखाण प्रत्ययकारी वाटले. वर्तमानपत्रामध्ये काम करताना सर्वस्पर्शी व्यापक दृष्टिकोनाची गरज असते, कोणतीही जबाबदारी न टाळता लिखाणामध्ये वैविध्य आणणे हेच पत्रकाराचे काम असते ते काम गोडबोले यांनी या पुस्तकात केले आहे, असे गोखले म्हणाले.
https://www.instagram.com/p/DA0NS3KpNqB
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक रतनलाल सोनग्रा होते. त्यांनी यावेळी गोडबोले यांच्या पत्रकारितेतील कार्याचा गौरव करत त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य नमूद केले. आचार्य अत्रे, ग.वा.बेहरे, वा.रा. कोठारी या जेष्ठ संपादकांच्या आठवणीही सोनग्रा यांनी यावेळी कथन केल्या. प्रभातकार कोठारी यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत दिलेल्या योगदानाच्याही आठवणी त्यांनी सांगितल्या.
https://www.instagram.com/p/DA0QJTTJNPE
उल्हासदादा पवार म्हणाले की गोडबोले यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत केवळ प्रभातशी च निष्ठा ठेवून तेथे 37 वर्षे काम केले. जिथे पत्रकारीतेला प्रारंभ केला तेथेच ते निवृत्त झाले. राजकारण्यांमध्ये सध्या अशी निष्ठा दिसत नाही. डाव्या विचारसरणीची माणसे एका क्षणात उजव्या विचारसरणीची होतात, त्या सगळ्या गमती जमती आज आपण सगळीकडे पाहत आहोत. त्यामुळे एकाच दैनिकाशी निष्ठा ठेवून गोडबोले यांनी केलेली पत्रकारिता महत्त्वाची वाटते.
बाळासाहेब शिवरकर म्हणाले की पुण्यातील वृत्तपत्रांची पूर्वीची स्थिती वेगळी होती.
त्यांचा प्रभाव मोठा होता. वर्तमानपत्रात आलेल्या वाचकांच्या पत्रातून एखादी तक्रार आली
तरी प्रशासन स्तरावर त्याची गांभीर्याने दखल घेऊन दुरुस्ती केली जायची परंतु आज
नेमकी दुर्दैवी स्थिती उद्भवली आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
https://www.instagram.com/p/DA0dMajJ0o1
यावेळी मनोगत व्यक्त करताना गोडबोले यांनी चार दशकातील पत्रकारितेने आपल्याला
सामाजिक विषयाचे भान दिले, सर्व क्षेत्रातील माहितगार बनवले असे नमूद केले.
तसेच त्यांनी यावेळी या पुस्तका मागची भूमिका विशद केली. संजय बालगुडे यांनी
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी आभार मानले.
https://www.instagram.com/p/DA0efpapHpu
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा