Chhagan Bhujbal On Mahayuti | “महायुतीतील कुणावरही अन्याय होणार नाही”, भुजबळांचे भाष्य; म्हणाले – “महायुती म्हणून पुढे जायचं असेल तर… “

chhagan bhujbal

मुंबई : Chhagan Bhujbal On Mahayuti | विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) तयारी महायुतीकडून सुरु झालेली आहे. मात्र महायुतीतील नेते एकमेकांवर जाहीर टीका करताना दिसत आहे. त्यामुळे महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरु आहे. तसेच शिंदे गटाचे (Shivsena Shinde Group) आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी १०० जागा जिंकण्याचे टार्गेट असल्याचे सांगत महायुतीत खळबळ उडवून दिली आहे.

या सर्व गदारोळावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वातावरण चांगले होत असताना आपापसांत मतभेद असल्याचं चित्र जनतेसमोर जाऊ नये याची काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.

महायुती म्हणून पुढे जायचं असेल तर, सगळ्यांचे मानपान राखून सर्वांना न्याय देत पुढे जावं लागणार, असा सल्ला देतानाच महायुतीच्या सगळ्याच नेत्यांना बुद्धी द्या, अशी गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो, असं विधान महायुतीतील ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी केले. याशिवाय विधानसभा निवडणुकीपर्यंत आयाराम गयाराम सुरूच राहणार असे सांगतानाच, महाराष्ट्राचे राजकारण भविष्यात कसे असेल याबाबतची दिशा स्पष्ट केली.

ते म्हणाले, महायुतीतील सर्वच पक्षांना न्याय मिळेल. कुणावरही अन्याय होणार नाही, हेच आश्वासन दिल्लीतील नेत्यांनीही दिलं आहे. आमदार आणि मंत्री आपापल्या परीनं काहीही बोलत असतात. मागण्या करण्यात काहीही चूक नाही. महायुती म्हणून पुढे जायचं असेल तर, सगळ्यांचा मानपान राखूनच न्याय देत पुढे जावं लागणार आहे.

महायुतीच्या सर्वच नेत्यांना बुद्धी द्या, अशी प्रार्थना मी गणेशाच्या चरणी करतो, असं छगन भुजबळ म्हणाले. आपापसांत वाद होतील अशी वक्तव्ये करू नका. आपल्यात मतभेद आहे, असे चित्र जनतेत जाता कामा नये, असंही भुजबळ यांनी सांगितले.

महायुतीतील सगळे कार्यकर्ते, नेते एकत्रच आहेत हे चित्र जनतेसमोर जाणं गरजेचं आहे.
अतिशय चांगले उपक्रम महायुतीने राबवले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana),
मोफत सिलिंडर, मुलींना मोफत शिक्षण अशा योजना आहेत.

गेल्या काही दिवसांपासून नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे पक्षप्रवेश सुरू आहेत. त्यावरही भुजबळांनी भाष्य केले.
एक दोन ठिकाणी असेच होणार आहे. सध्या शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादीचे दोन असे मिळून एकूण ६ पक्ष झाले आहेत.

तीन पक्ष एका ठिकाणी, तीन पक्ष दुसऱ्या ठिकाणी आहेत.
काही ठिकाणी विद्यमान आमदार असल्याने उरलेल्या लोकांना इकडेतिकडे जावे लागणार आहे.
निवडणुकीपर्यंत दोन्ही बाजूंनी आयाराम गयाराम सुरूच राहणार, असे भुजबळ यांनी म्हंटले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | डिलेव्हरी बॉईजचा राडा ! डिलेव्हरी बॉईजनी सुरक्षारक्षकाला केला जीवे मारण्याचा प्रयत्न (CCTV Video)

Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे भाजपची गोची; नेत्यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान; डोकेदुखी वाढली

Shivaji Nagar Pune Crime News | बनावट 7/12 सादर करुन न्यायालयाची फसवणूक करणार्‍या महिलेवर गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Crime Branch News | पिस्तुल बाळगणार्‍या तरुणाला अटक ! गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे जप्त

You may have missed