Jayant Patil On Ajit Pawar | ‘ते अजित पवारांना सांगतील आता तुम्ही वेगळी निवडणूक लढवा’, जयंत पाटलांचे वक्तव्य; म्हणाले – “त्यांना सोबत घेतल्याने भाजपची विश्वासार्हता…’

पुणे: Jayant Patil On Ajit Pawar | विधानसभा तोंडावर (Maharashtra Assembly Election 2024) असताना महायुतीत (Mahayuti) अजित पवारांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे त्यावरून शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. अजित पवार यांना बरोबर घेतल्यानं भाजपची विश्वासार्हता कमी झाली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे ते त्यांना आता तुम्ही थोडसं दुर उभं राहा म्हणू शकतील. निवडणुकीनंतर परत आपण जवळ येऊ. आता तुम्ही वेगळी निवडणूक लढवा असंही सांगतील अशी शंका त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पाटील म्हणाले, महायुती अडचणीत असल्याने अजित पवार यांनी तात्पुरते वेगळं व्हावं, वेगळं लढावं असं कदाचित त्यांना सांगितलं जाऊ शकते. अजित पवारांना सोबत घेतल्याने त्यांची विश्वासार्हता महाराष्ट्रातच नाही तर, देशात कमी झाली आहे. निवडणुक झाल्यानंतर आपण परत बरोबर येऊ, असे सांगितले जाऊ शकते, असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले आहे.
मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना पाटील म्हणाले, आमचा मुख्यमंत्री व्हावा असं लोकांना वाटतंय. शरद पवार यांची भूमिका महाविकास आघाडी एकसंध राहायला पाहिजे अशी आहे. आमचा मुख्यमंत्री व्हावा असं लोकांना वाटतंय हे खरंच आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा