Jitendra Awhad On Ajit Pawar | “बारामती विधानसभा लढवणार, सहानभूती निर्माण होण्यासाठी अजित पवारांचे वक्तव्य”; जितेंद्र आव्हाडांचे टीकास्त्र

मुंबई : Jitendra Awhad On Ajit Pawar | विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) लगबग सुरु झालेली आहे. जागावाटपावर पक्षांमध्ये बैठका सुरु आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाने जनसन्मान यात्रेतून (Jan Sanman Yatra) महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. अजित पवारांच्या पिंक पॉलिटिक्सवर सध्या चर्चा रंगली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha) सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) पराभव केला. त्यावेळी अजित पवारांच्या मतदारसंघातूनही सुप्रिया सुळेंना लीड मिळाल्याचे पाहायला मिळालं. यावरून विधानसभेबाबत अजित पवारांनी महत्वाचे विधान केले आहे.
“आता मीही ६५ वर्षांचा झालोय. मी समाधानी आहे. जिथे पिकतं, तिथे विकत नसतं. एकदा बारामतीकरांना मी सोडून कुणीतरी आमदार मिळायला हवा. मग तुम्ही १९९१ ते २०२४ च्या माझ्या कारकिर्दीची आणि त्या नव्या माणसाच्या कारकिर्दीची तुलना करा.
मी कधी वेगळी भूमिका घेतली नाही. तरी निवडणुकीच्या वेळी काय झालं तुम्ही बघा. जर यंदाच्या निकालासारखी गंमत होणार असेल तर आपली झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणायचं”, अशी टिप्पणी बारामतीत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
त्यामुळे बारामतीतून न लढण्याचे संकेत त्यांनी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली. त्यावरून आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. (Baramati Assembly Election 2024)
अजित पवार बारामतीमधून लढणार आहेत, लोकांची मानसिकता संभ्रावस्थेत नेणं ही एक कला आहे आणि त्या कलेचा ते वापर करत असल्याचा पलटवार शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. लोकांची सहानभूती कशी निर्माण होईल यासाठी सर्व प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अजित पवार यांच्या काळामध्ये शरद पवार हे मुख्यमंत्री होते. शरद पवार देशाचे विरोधी पक्ष नेते होते. शरद पवार उच्चपदस्थ राजकारणी होते. त्यामुळे कोणी पंतप्रधान असो, कुठलाही मंत्री असं ते सगळे पवार साहेबांच्या संबंधापोटी बारामतीत व्यवस्थित लक्ष देत होते.
असे जर त्यांना वाटत असेल की त्यांच्यामुळे बारामती उभी राहिली तर हा त्यांचा गैरसमज आहे,
या गैरसमजातूनच ते मागे पडले. बारामती खरी उभी राहिली ती पवार साहेबांमुळेच,
असा टोला आव्हाडांनी अजित पवारांना लगावला आहे.
आव्हाड म्हणाले, ” वडीलधाऱ्या माणसाचे अपमान करणे, पाडून बोलणे, वडीलधाऱ्या माणसाची मृत्यूची इच्छा व्यक्त करणे हे लोकांना आवडत नाही पटत नाही.
अजित पवार काम करत नाहीत का? काम करतात. मात्र, काकांना बाहेर काढावं हे लोकांना आवडलं नाही. सर्व बारामतीला माहिती आहे बॉस कोण आहे ते.
कामाशिवाय देखील आपलं नातं असतं. कुठलीही विधानसभा ही भवितव्याची निवडणूक असते.
महाराष्ट्र भवितव्य कोण देणार हे सर्वांना माहिती आहे. पक्ष अक्षरशः हिसकावून घेतला, राजकीय करामती केल्या तुम्ही.
एवढा प्रामाणिकपणे तुम्हाला पश्चाताप होत असेल,
तर पत्रकारांना जाऊन सांगा हा पक्ष आणि निशाणी मी चोरून आणला आहे, असे आव्हानही आव्हाडांनी अजित पवारांना दिले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा