Maharashtra Assembly Election 2024 | महायुती आणि महाविकास आघाडीला आता ‘महाशक्ती’चे आव्हान; विधानसभेला तिहेरी लढत पाहायला मिळणार

पुणे : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणूक मोठी रंगतदार होणार आहे. विधानसभेला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) अशी लढाई होणार अशी चर्चा असतानाच आता प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu), स्वराज्य संघटनेचे संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Chhatrapati), भारतीय बौद्ध महासभेचे राजरत्न आंबेडकर (Rajratna Ambedkar), स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्यासारख्या इतर छोट्यामोठ्या संघटनांनी एकत्र येऊन नवीन आघाडीबाबत चर्चेला सुरूवात केली आहे. तिसऱ्या आघाडीसाठी आज पुण्यात महत्त्वाची बैठक पार पडत आहे.
सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही आता पर्याय उभा राहात आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत तीन-तीन पक्ष असल्याने एकाच मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची संख्या अधिकची आहे. त्यामुळे बंडखोरी होऊ शकते अशी मांडणी होत असतानाच आता तिसऱ्या आघाडीतील उमेदवार आणि त्यामध्ये नाराज झालेले इच्छुक उमेदवार म्हणजे एका मतदारसंघात मतदारांना अनेक पर्याय उपलब्ध असणार आहेत.
मात्र मतदान करताना मतदारांपुढे गोंधळाची परिस्थितीही निर्माण होऊ शकते. कारण राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षात बंड झाल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे सामान्य मतदाराला कोण कोणत्या पक्षात आहे? याबाबत संभ्रम निर्माण होऊ शकतो.
मात्र आता तिसऱ्या आघडीची चर्चा जोरात सुरु आहे. तिसरी आघाडी कोणते महत्वाचे मुद्दे घेऊन जनतेपर्यंत उतरणार हा महत्वाचा मुद्दा असणार आहे. याबाबत बोलताना बच्चू कडू म्हणाले, ” सत्तेचं विकेंद्रीकरण असलं पाहिजे. सत्तेला अनेक पर्याय उभे राहिले पाहिजे. दावेदारी वाढली, पक्ष वाढले तर काम करणाऱ्यांना अधिक काम करावे लागते. कामाशिवाय पर्याय नाही असे त्यांनी सांगितले. तसेच महायुती असो महाविकास आघाडी यांचे लक्ष्य सत्तेवर आहे मात्र आमचे लक्ष जनतेवर आहे. हक्काच्या लढाईसाठी आम्ही लढतोय. प्रत्येक घटकातील गरीबांसाठी ही लढाई आहे.
राज्यातील राजकीय अवस्था विचित्र झाली आहे. या स्थितीत शेतकऱ्यांसाठी पर्याय उभा केला पाहिजे. उद्या जर आमचे चांगले उमेदवार निवडून आले तर आम्ही सत्ता बनवू. राज्यातील रयतेसाठी आम्ही ही खेळी करतोय. जर ही खेळी यशस्वी झाली तर देशातील हे राज्य शेतकरी आणि मजुरांना न्याय देणारं राज्य ठरेल. ही आमची तिसरी आघाडी नव्हे तर महाशक्ती असेल”, असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.
“दरम्यान, तिसऱ्या आघाडी या शब्दाला आमचा आक्षेप आहे.
ते दोन पहिले आणि आम्ही तिसरे का? गेल्या ५ वर्षात महायुती आणि महाविकास आघाडी आलटून पालटून अडीच अडीच वर्ष सत्तेत होते.
या दोघांनी महाराष्ट्राची वाट लावली आहे. आम्ही व्यापक आणि आश्वासक आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय.
शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. जनतेची ताकद उभी करून चांगले लोकप्रतिनिधी निवडून आणण्यासाठी आम्ही तयारी करतोय”,
असं माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. (Maharashtra Assembly Election 2024)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा