Maharashtra Weather Update | 4 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा; रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा परिसर, सांगली, सोलापुरला हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई : Maharashtra Weather Update | दिवसा वाढती उष्णता आणि संध्याकाळी अचानक थंड वारे वाहत आहे. दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्याचा वेग वाढत असून, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडत आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून येत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रासाठी विशेष अलर्ट जारी केला आहे. शनिवारी (29 मार्च) 4 जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने (Meteorological Department) चार जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलका पाऊस पडेल, तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, घाटमाथा आणि सांगली जिल्ह्यात ताशी ४० किमी वेगाने वारे वाहतील.
रविवारी (30 मार्च) रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, घाटमाथा परिसर, सांगली आणि सोलापुरात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सातारा जिल्हा, घाटमाथा, भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल, असा इशारा देण्यात आला आहे. बीड, धाराशिव भागातही पावसाच्या हलक्या सरी बरसणार आहेत. राज्यावर मार्च महिन्यात अवकाळी पावसाचे संकट आल्याने शेतकरी आणि बागायतदार चिंताग्रस्त आहेत.