Mahayuti News | महायुतीत वादंग! शिवसेना शिंदे गटाच्या पहिल्या उमेदवाराची मुख्यमंत्री शिंदेंकडून घोषणा; चंद्रशेखर बावनकुळे झोपले होते का? म्हणत भाजपचे अनेक नेते राजीनामे देण्याच्या भूमिकेत

रामटेक : Mahayuti News | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचा (Shivsena Shinde Group) पहिला उमेदवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जाहीर केल्याने भाजपचे अनेक नेते नाराज झाले आहेत. दरम्यान त्यांनी पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा देणार असल्याची भूमिका घेतली आहे.
https://www.instagram.com/p/DBI89paCpy3
रामटेक मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या या उमेदवारीला भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. त्यांनी उमेदवारी न घेतल्यास आम्ही सामूहिक राजीनामे देऊ असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
https://www.instagram.com/p/DBI1tk2pdwu
आशिष जयस्वाल हे रामटेक विधानसभा मतदारसंघातून चार वेळा निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी युतीधर्म न पाळता भाजपच्या उमेदवाराविरोधात बंड केले होते. यानंतर जयस्वाल यांनी ठाकरे सरकारच्या काळात महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) पाठिंबा देखील दिला होता.
https://www.instagram.com/p/DBI0DLNi9oo
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर जयस्वाल यांनी शिंदे यांची साथ दिली होती.
तेव्हापासून ते मुख्यमंत्री शिंदे यांच्या संपर्कात होते. नुकताच मुख्यमंत्री शिंदे यांनी विदर्भाचा दौरा केला.
यावेळी त्यांनी पारशिवनी मध्ये विकास कामाचे भूमिपूजनही केले.
यावेळी आशिष जयस्वाल यांनी शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश केला.
त्यानंतर शिंदेंनी रामटेक मतदारसंघातून त्यांना उमेदवारी जाहीर केली.
https://www.instagram.com/p/DBIybbjiWNV
दरम्यान भाजपचे नेते आणि पदाधिकारी नाराज झाले आहेत. मुख्यमंत्री येतात आणि मतदारसंघातून उमेदवारी घोषित करतात. त्यांनी आम्हाला कुठेही विश्वासात घेतलं नाही. त्यामुळे त्यांनी ज्या नावाची घोषणा केली, त्यांना आमचा विरोध आहे.
https://www.instagram.com/p/DBIu730CMbA
आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) यांच्या उमेदवारीचा पुन्हा विचार करावा. आम्ही पाच वर्ष त्रास घेतला, रामटेकमध्ये पंचायत समिती, ग्रामपंचायतीला एकही रुपयांचा निधी मिळाला नाही, असे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. आशिष जयस्वाल यांनी आमची कामे होऊच दिली नाहीत मग आम्ही त्यांचे काम कसं करू? असा सवालही भाजप पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
https://www.instagram.com/p/DBItOhjiizY
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आमचे नेते आहेत त्यांनी विचार करावा.
एकनाथ शिंदे जेव्हा उमेदवारी जाहीर करत होते. तेव्हा चंद्रशेखर बावनकुळे हे झोपले होते का? असा संतापही भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. आशिष जयस्वाल यांची उमेदवारी मागे न घेतल्यास येत्या १७ तारखेला आम्ही राजीनामे देऊ, असा इशाराच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
https://www.instagram.com/p/DBIp7H-Jvkz
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police Tadipari Action | जबरी चोरी करणार्या सराईत गुंडाला 2 वर्षासाठी केले तडीपार