Pune Crime News | ट्रिगर दाबल्याशिवाय रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटू शकत नाही ! अग्नीशस्त्र बाळगणार्यांकडून घेतली जात नाही काळजी

पुणे : Pune Crime News | लोकप्रिय अभिनेते गोविंदा (Govinda) हे रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटल्याने जखमी झाले होते. पुण्यातही दोन दिवसांपूर्वी बॅग खाली पडून गोळी सुटल्याने एक शाळकरी मुलगा जखमी झाल्याची घटना घडली होती. परंतु, अशा प्रकारे रिव्हॉल्व्हरची बॅग खाली पडल्याने गोळी सुटू शकत नाही. ट्रिगर दाबल्याशिवाय रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटू शकत नसल्याचे निवृत्त सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे (Bhanupratap Barge) यांनी सांगितले.
पिस्तुल साफ करताना गोळी उडून उद्योजक जखमी, रिव्हॉल्व्हर खाली पडल्याने गोळी सुटल्याने जखमी अशा बातम्या नेहमी वाचनात येतात. याबाबत नेमकी परिस्थिती काय असावी. पिस्तुल, रिव्हॉल्व्हर वापरणार्यांनी काय काळजी घ्यावी, याविषयी भानुप्रताप बर्गे यांच्याशी संवाद साधला. पिस्तुल आणि रिव्हॉल्व्हरवर मध्ये फरक असतो. पिस्तुलला लॉक सिस्टिम असते. त्यात चेंबरमध्ये काडतुस लोड करावे लागते. ओढून लोड करायचे असते.
काही रिव्हॉल्व्हरमध्येही लॉक सिस्टिम असते. रिव्हॉल्व्हरमध्ये ६ चेंबर असतात. सुरक्षा म्हणून त्यातील पहिले चेंबर नेहमी रिकामे ठेवणे श्रेयस्कर असते. अनेक जण पहिले चेंबर रिकामे ठेवतात. केवळ ५ चेंबरमध्ये गोळ्या भरतात. कोणत्याही कारणावरुन तुमच्या रागाचा पारा वाढला तर एक ते १० आकडे मोजावे असे म्हटले जाते. पहिले चेंबर रिकामे ठेवल्याने तुम्ही रागाच्या भरात रिव्हॉल्व्हरचा वापर करण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला विचार करायला काही वेळ मिळतो. त्यामुळे रिस्क कमी होते. पहिला ट्रिगर दाबल्यावर तो रिकामा असल्याने गोळी सुटत नाही़ जर तुम्ही पहिले चेंबर रिकामे ठेवले नाही तर त्यातून अनर्थ घडण्याची घटना घडू शकते.
तुम्हाला बाहेर जायचे असेल तर अनेक जण पिस्तुल लोड करुन ठेवतात. त्यातील एक गोळी चेंबरमध्ये असते. अशा वेळी घरी परत आल्यावर सर्वप्रथम पिस्तुल अनलोड करणे आवश्यक आहे. जर पिस्तुल अनलोड न करताच ठेवले. तुमच्या नकळत कोणी ते हाताळले तर त्यातून अनर्थ घडू शकतो. आम्ही अनेकदा अधिकार्यांना आपले शस्त्र दाखविताना त्याचे चेंबर आमच्या बाजूला येईल, अशा पद्धतीने दाखवतो. त्यावेळी आम्हाला माहिती असते की त्यात गोळी नाही.
शस्त्राबाबत काय काळजी घ्यावी
पिस्तुल, रिव्हॉल्व्हर ही शस्त्रे हाताळताना नेहमीच काळजी घ्यावी लागते. पिस्तुल हे लॉक करुन ठेवावे. तसेच वापर करायचा नसेल तर त्याचे मॅगझिन काढून रिकामे ठेवावे.
रिव्हॉल्व्हरचे पहिले चेंबर नेहमी रिकामे ठेवावे़ जेणे करुन कोणताही अनर्थ घडणार नाही.
पिस्तुल आणि रिव्हॉल्व्हर याचा वापर झाला असेल तर त्याच्या बॅरलमध्ये दारु सांडलेली असल्याने तेथे बुरशी जमा होत असते. त्यामुळे ही शस्त्रे साफ करावी लागतात. ती साफ करताना पिस्तुलाचे मॅगझिन अगोदर काढून ठेवावे. त्याच्या चेंबरमध्ये गोळी नाही ना याची खात्री करावी. रिव्हॉल्व्हरच्या चेंबरमधील सर्व गोळ्या काढून ठेवाव्या. साध्या कॉटनने बॅरेलमध्ये साचलेली बुरशी साफ करता येते. पिस्तुल अथवा रिव्हॉल्व्हर हे खाली पडल्याने त्यातील गोळी सुटू शकत नाही. पिस्तुलातून फायर करण्यापूर्वी बॅरेल पुढे मागे करुन ते लोड करावे लागते. तसेच रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर दाबला गेल्याशिवाय त्यातून कधीही गोळी सुटू शकत नाही. एखाद्या बॅगेत रिव्हॉल्व्हर असेल आणि केवळ ती बॅग खाली पडली तर त्याचा ट्रिगर दाबला जाऊ शकत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत त्यातून गोळी सुटण्याची शक्यता दिसून येत नसल्याचे बर्गे यांनी सांगितले.
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sharad Pawar On Jayant Patil | शरद पवारांचे जयंत पाटलांबाबत सूचक वक्तव्य; म्हणाले, ”
जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची…”
Maharashtra Assembly Election 2024 | काँग्रेसकडून पिंपरी, भोसरी, चिंचवड विधानसभा मतदारसंघावर दावा;
अनेकांनी दिल्या मुलाखती
Pune ACB News | उत्पन्नापेक्षा कोट्यवधींचा मालमत्ता बाळगणार्या शिरीष यादव याच्यावर गुन्हा दाखल;
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
Pune Politics News | महायुतीच्या पुणे महानगर व पुणे ग्रामीण जिल्हा समन्वयक पदी संदीप खर्डेकर
यांची नियुक्ती; खर्डेकर म्हणाले – ‘महायुती पुणे शहर व जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व एकवीस जागा जिंकणार’