Pune News | ‘आनंदघन’ मधील जेष्ठ नागरिकांनी लुटला विविध कलागुणांचा आनंद

पुणे : Pune News | परांजपे स्कीमतर्फे अथश्री गृहप्रकल्पातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘आनंदघन’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच पार पडला. यात परांजपे स्कीमच्या विविध प्रकल्पांमध्ये रहिवासी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी कला गुणांचा उत्सवच जणू साजरा केला. या कार्यक्रमात वय वर्ष ६० ते ९० हून अधिक वयोगटातील १६८ पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिक रहिवाशांनी गायन, नृत्य आणि नाटकांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
रविवारची सकाळ तशी आरामदायी आणि उशिरा सुरु होणारी असते. मात्र आज अथश्री मधील ही सर्व जेष्ठ नागरिक मंडळी सकाळी लगबगीने कार्यक्रमासाठी तयार झाली होती. त्यांचे उत्साही प्रफुल्लित आनंदी चेहरे….age is just the number याची अनुभूती देणारे होते. साठीतील, सत्तरीतील अगदी नव्वदीतील या जेष्ठ तरुणांनी आपल्या नृत्य, गायन आणि नाटकाच्या स्किटने वातावरण अगदी मंत्रमुग्ध केले. “शोला जो भडके”…जरा होले होले चलो मेरे साजना…तारीफ क्या करू…गाण्यानी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. “पारू ग पारू.”….मी हाय कोली…ही कोळी गीतं तर जुन्या जमान्यातील भुले बिसरे हा हिंदी गीतांचा कार्यक्रम सादर केला. एवढंच नव्हे तर आमच्या भावना दुखावतात हो…हे विचार करायला लावणारे स्किट देखील सादर केले. अनेक संस्मरणीय सादरीकरणांपैकी, दोन खास सादरीकरणे वेगळी होती – ९०हून अधिक वयोगटातील रहिवाशांचे विशेष सादरीकरण, ज्यांनी त्यांच्या उर्जेने आणि उत्साहाने प्रेक्षकांना उठून उभे राहून दाद देण्यास भाग पाडले. या सादरीकरणांनी कला आणि अभिव्यक्तीवरील प्रेम वयाच्या पलीकडचे असते आणि चिरकाल ते वाढत राहते याची हृदयस्पर्शी आठवण करून दिली.
यावेळी परांजपे स्कीमचे व्यवस्थापकीय संचालक श्री शशांक परांजपे यांनी आवर्जून या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह वाढवला. त्यांच्याशी संवाद साधत श्री. शशांक परांजपे यांनी बालपणीच्या स्नेह संमेलनाच्या आठवणींना उजाळा दिला. आनंदघन या कार्यक्रमात अथश्रीच्या प्रतिभावान ज्येष्ठ रहिवाशांनी सादर केलेल्या सामूहिक नृत्य आणि संगीतापासून ते नाटक आणि स्किटपर्यंतच्या विविध सादरीकरणांचा समावेश होता. या कार्यक्रमाने हे सिद्ध केले की वय हे सर्जनशीलतेसाठी अडथळा असू शकत नाही. अथश्रीच्या सर्व ठिकाणी पेरल्या गेलेल्या एकात्मतेच्या भावनेचे फलित म्हणजे विभिन्न सादरीकरणाचे झालेले उत्साहवर्धक प्रकटीकरण होय.
या कार्यक्रमात सहभागींच्या कला गुणांचा गौरव तर झालाच, शिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठी सक्रिय आणि परिपूर्ण जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित झाले. आनंदघनने केवळ अथश्रीच्या रहिवाशांनाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबांना आणि व्यापक समुदायाला एकत्र आणले आहे, ज्यामुळे वृद्धांप्रति असलेल्या संबंधाची आणि कौतुकाची सखोल भावना जनमनात निर्माण झाली आहे. हा कार्यक्रम सर्जनशीलता, आनंद आणि जीवनावरील प्रेम कधीही कमी होत नाही; याची जाणीव करुण देतो.
अथश्री बद्दल: ज्येष्ठ नागरिकांच्या राहणीमानाला नवी दिशा देताना
२००२ मध्ये सुरू झालेली अथश्री ही एक ज्येष्ठ नागरिक गृहनिर्माण संकल्पना श्री. शशांक परांजपे यांनी स्वतः त्यांच्या जीवनशैली आणि गरजा लक्षात घेऊन विचारपूर्वक तयार केली आहे. अथश्री हे असे ठिकाण आहे जिथे ज्येष्ठ नागरिक खरोखरच सन्माननीय, सुरक्षित, निरोगी, त्रासमुक्त आणि आनंदी जीवन जगू शकतात. ज्येष्ठांच्या अद्वितीय गरजा ओळखून, अथश्री असे वातावरण देते जिथे आरोग्य, सुरक्षितता आणि सहवास प्राधान्यक्रम असतो. एकूण १६ अथश्री आहेत ज्यापैकी १३ पुण्यात, २ वडोदरा येथे आणि १ बंगळुरूमध्ये आहे.