Sharad Pawar | पुतळ्याच्या उभारणीत झालेल्या भ्रष्टाचारावर शरद पवारांचे भाष्य; म्हणाले – ” कुठे भ्रष्टाचारी भूमिका घेऊ नये याचे तारतम्य…”

मुंबई : Sharad Pawar | नौदल दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत मालवण येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला होता. त्यावेळी मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा (Malvan Shivaji Maharaj Statue) उभारण्यात आला होता. हा पुतळा उभारण्याचं कंत्रात मेसर्स आर्टिस्ट्री कंपनीला देण्यात आले होते. मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले जात आहे.
मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी (दि.२६) दुपारी एकच्या सुमारास कोसळला. नट बोल्ट गंजल्याने हा पुतळा कोसळला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे. तर ही घटना घडली तेव्हा वाऱ्याचा वेग ४५ किमी प्रतितास होता. त्यामुळे पुतळा कोसळला असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले.
दुसरीकडे महाविकास आघाडीने या घटनेवरून महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. या घटनेच्या निषेधार्थ मविआकडून रविवारी १ सप्टेंबर रोजी हुतात्मा स्मारकाला वंदन करून गेट वे ऑफ इंडियाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महायुती सरकारला जोडे मारो आंदोलन केले जाणार आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली. यावेळी बोलताना शरद पवार यांनी पुतळ्याच्या उभारणीत झालेल्या भ्रष्टाराचाराबद्दल भाष्य केले.
शरद पवार म्हणाले, ” साधी सरळ गोष्ट आहे यात राजकारण कुठेय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये रांझ्याच्या पाटलाने एका महिलेवर अत्याचार केले. त्यावेळी ही तक्रार छत्रपती शिवरायांपर्यंत गेली. त्यानंतर त्यांनी त्याचे दोन्ही हात कलम केले. (Sharad Pawar)
अशा कृत्याची परिणीती काय हे त्यांनी जनतेच्या समोर ठेवलं.
एका भगिनीला त्रास दिला म्हणून एवढा कठोर निर्णय त्यांनी घेतला.
आज असा निर्णय घेणाऱ्याची प्रतिकृती तयार करण्यात जो भ्रष्टाचार झाला त्यामुळे ती मूर्ती उद्धवस्त झाल्याची दिसते”,
असे शरद पवार यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ” कुणीतरी सांगितले की वाऱ्याच्या वेगाने कोसळली. तिथे पंतप्रधानांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झालं.
आज भ्रष्टाचार किती टोकाला पोहोचला आहे. कुठे भ्रष्टाचारी भूमिका घेऊ नये याचे तारतम्य सुद्धा या सरकारमध्ये नाही.
लोकांच्या मनातील तीव्र भावना खुली करावी म्हणून आम्ही तिघांनी महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करुन
हा कार्यक्रम हाती घेतला आहे”, असं शरद पवार यांनी स्पष्ट केले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Gaikwad On Badlapur Case | बदलापूर प्रकरणावरून शिंदे गटाच्या नेत्याचे अजब विधान, म्हणाले –
“आता काय मुख्यमंत्री शाळेत जाऊन पहारा देतील का?”
Kondhwa To Delhi Samajik Nyay Yatra | ‘कोंढवा ते दिल्ली’ सामाजिक न्याय पदयात्रा 1 सप्टेंबर पासून