Solapur Crime News | विजेचा धक्का बसल्याने नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

सोलापूर : Solapur Crime News | विजेचा धक्का बसल्याने नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राजनंदिनी अणय कांबळे असे मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ही घटना शहरातल्या कोनापुरे चाळ परिसरात मंगळवार (दि.८) रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली.
अधिक माहितीनुसार, मंगळवार (दि.८) संध्याकाळी झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे विजेची तार तुटून लोखंडी जिन्यात विद्युत प्रवाह उतरला होता. या लोखंडी जिन्याला स्पर्श झाल्याने राजनंदिनी हिला विजेचा तीव्र झटका बसल्याने ती जागीच बेशुद्ध झाली. तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान महावितरणच्या हलगर्जीपणामुळे या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी केला आहे. नागरिकांनी संतप्त होत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.