Supriya Sule On Central Home Ministry Report | राज्यात गुन्हेगारी वाढल्याचा केंद्रीय गृहमंत्रालयाचा अहवाल; सुप्रिया सुळेंची महायुती सरकारवर टीका

बारामती : Supriya Sule On Central Home Ministry Report | नित्कृष्ट कामामुळे मालवण येथे उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला (Malvan Shivaji Maharaj Statue) . याशिवाय राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचाराचा निषेध नोंदवण्यासाठी आज बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सुळे यांनी महायुती सरकारवर (Mahayuti Govt) निशाणा साधला.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर या सरकारला बहिणी आठवल्या. हे सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यात गुन्हेगारी वाढली याबाबतचा अहवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या गृहविभागाने दिला आहे. स्वर्गीय आर.आर पाटील गृहमंत्री असताना महिलांच्या छेडछाडीचे प्रकार घडत नव्हते.
त्यांना जे जमले ते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) का करू शकत नाहीत. गृहमंत्री फडणवीस घर पक्ष फोडा, आधी, भ्रष्टाचार, कॉन्ट्रॅक्टर, दिल्ली दौऱ्यातच व्यस्त आहेत, अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी फडणवीसांवर निशाणा साधला. तसेच फडणवीसांनी राजीनामा देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचा मान आम्ही राखतो. मावळमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेमधील आरोपीला दोन महिन्यात फाशी दिली. कधी आणि कोणाला फाशी दिली हे त्यांनी दाखवावं. मी स्वतः महिलांसोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचा मी जाहीर सत्कार करेन, असे आव्हानही सुळे यांनी दिले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्यामध्ये महिलांवर होत असलेले अत्याचार ही चिंताजनक बाब आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी या सरकारची आहे.
दुर्दैवाने बदलापूर घटनेमध्ये (Badlapur Case) लोक रस्त्यावर उतरल्यानंतर सरकार जागे झाले.
पीडित मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला या सरकारने जर फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून फाशी दिली असती,
तर राज्यातील प्रत्येक महिलेने या सरकारला ओवाळले असते, मुख्यमंत्र्यांना ओवाळण्यासाठी मी स्वतः गेले असते.
राज्यातील इतर ठिकाणीही महिलांवर होत असलेले अत्याचार गंभीर आहेत.
महाराष्ट्रात वाढलेली गुन्हेगारी गंभीर असल्याने देवेंद्र फडणवीस यांचे गृहखाते याला जबाबदार आहे.
गृहमंत्री फडवणीस यांच्याकडुन खुप अपेक्षा होत्या. पोलीसांवर झालेल्या कोयता हल्ल्याचा उल्लेखही सुळे यांनी यावेळी केला.
त्या पुढे म्हणाल्या, ज्याठिकाणी पोलीस सुरक्षित नाहीत, त्याठिकाणी जनतेचे काय.
यामध्ये पोलीसांची चुक नाही. कारण वर्दीची भीतीच राहिलेली नसल्याचा आरोप खासदार सुळे यांनी यावेळी केला.
मुलींना मोफत उच्च शिक्षणाची केवळ घोषणा करण्यात आली.
मात्र, याबाबतचा अधिकृत परीपत्रक अद्याप काढले नसल्याचे सुळे यांनी सांगितले. (Supriya Sule On Central Home Ministry Report)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Gaikwad On Badlapur Case | बदलापूर प्रकरणावरून शिंदे गटाच्या नेत्याचे अजब विधान, म्हणाले –
“आता काय मुख्यमंत्री शाळेत जाऊन पहारा देतील का?”
Kondhwa To Delhi Samajik Nyay Yatra | ‘कोंढवा ते दिल्ली’ सामाजिक न्याय पदयात्रा 1 सप्टेंबर पासून