Pune Ganesh Visarjan Miravnuk | पुणे : गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार ! 28 तास चालली मिरवणूक; कोणतीही अनुचित घटना नाही, पोलीस आयुक्तांने मानले सर्वांचे आभार (Videos)

पुणे : Pune Ganesh Visarjan Miravnuk | पुणे शहराची वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणूक अत्यंत शांततेत आणि उत्साहात पार पाडली. 28 तास चाललेल्या या मिरवणूकीत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडली नसल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar) यांनी बुधवारी दिली.
मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या आरतीने विसर्जन मिरवणूकीस सुरूवात झाली. त्यानंतर बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत ही मिरवणूक चालली. मिरवणूक संपल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma), DCP संदीपसिंह गिल (Sandeep Singh Gill) यांच्यासह इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.
ते म्हणाले की, गणेश विसर्जन मिरवणूक अत्यंत शांततेत आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडली. त्यासाठी शहर पोलीसांतर्फे मी सर्व गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो. धन्यवाद देतो. त्यांनी पोलिसांशी चांगला समन्वय ठेऊन मिरवणूक चांगल्या वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य केले. त्याचबरोबर शहरात दाखल झालेल्या गणेश भक्तांचा जनसमूदाय जरी मोठा असला तरी त्यांचे देखील पोलिसांना सहकार्य मिळाले.
लेझर लाइट वापरलेल्यांवर होणार कारवाई
पोलीस आयुक्त म्हणाले की, मिरवणूकीत लेझर लाइट वापरावर पूर्णपणे बंदी होती. मिरवणुकीच्या मुख्य मार्गांवर लेझर लाइटचा उपयोग झालेला नाही. जिथे लेझर लाइटचा वापर आढळला तेथे पोलीस ते बंद करायला लावत होते. तरी देखील किती जणांनी त्याचा वापर केला आहे याचा आकडा अद्याप आलेला नाही. त्याचा आढावा घेऊन संबंधित मंडळांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
ध्वनीची मर्यादा ओलांडणाऱ्यांवर देखील कारवाई
ते म्हणाले की, आवाजाचे रिडिंग घेण्यात आले आहे. ते बघून ज्या मंडळांनी ध्वनीची मर्यादा ओलांडली आहे त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार आहे.
बंदोबस्ताबरोबर पोलिसांच्या आरोग्याचे, सुविधांचे होते आव्हान
गणेश विसर्जन मिरवणुकीत शहरात मोठ्या प्रमाणावर जन समुदाय येत असल्याने पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त असतो. हजारोंच्या संख्येत पोलीस रस्त्यावर असतात. त्यामुळे मिरवणूक शांततेत पार पाडण्याबरोबरच पोलिसांचे आरोग्य देखील महत्वाचे असते. बंदोबस्त करताना त्यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होत नाही ना हे देखील बघावे लागते. त्यांना पूर्णपणे सुविधा मिळत आहेत ना, याकडे लक्ष द्यावे लागते. त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात ठेऊन बंदोबस्ताचे नियोजन करावे लागते.(Pune Ganesh Visarjan Miravnuk)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा