Nirbhay Bano Movement | निर्भय बनो सभांना राज्यातील 71 ठिकाणांहून मागणी ! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या मतदारसंघातील विविध संघटनांनी केली मागणी

पुणे : Nirbhay Bano Movement | लोकसभा निवडणुकीमध्ये नागरिकांची ऊर्जा महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) बाजूने वळविण्यात निर्भय बनो च्या सभांचा महत्वाचा वाटा आहे. या पार्श्वभूमीवर विविध लोकशाही संघटना आणि अनेक राजकीय पक्षांनी आता निर्भय सभांची मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मतदारसंघासह राज्यातील ७१ ठिकाणावरुन सभांची मागणी आल्याचे निर्भय नागरिक सभांचे समन्वयक उत्पल चंदावर (Utpal Chandawar) यांनी सांगितले आहे.
https://www.instagram.com/p/DAU81-6pXAq
लोकसभा निवडणुकीच्या काळात राज्यात विविध ठिकाणी निर्भय बनो सभा घेण्यात आल्या होत्या. महाविकास आघाडीला त्याचा फायदा झाला होता.
https://www.instagram.com/p/DAU-mQgJyxZ
राजकारणाला व राजकीय नेत्यांना समाजातील प्रश्नांचा प्राधान्यक्रम ठरवता आला पाहिजे. सतत दिखाऊपणा, जाहिरातींवर जनतेचा पैसा उधळणे चुकीचे आहे. याची जाणीव जशी आम्ही मतदारांना करुन दिली़ त्याचप्रमाणे यावेळी शेती, कृषी उत्पादन, भाव, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, कायदे असे विषय आम्ही चर्चेत आणणार असल्याचे डॉ. विश्वंभर चौधरी (Dr. Vishwambhar Chaudhary) यांनी सांगितले.
https://www.instagram.com/p/DAVBFyjJj6A
निर्भय नागरिकांच्या सभा घेताना यावेळी आमचा महाविकास आघाडीला सशर्त पाठिंबा असेल व माविआ निवडून आल्यावर महाराष्ट्रातील जनतेसाठी कोणती कामे प्राधान्याने करणार हे त्यांनी निर्भय नागरिक सभा घेणार्या टीमला स्पष्ट पणे सांगावे, असे अॅड. असीम सरोदे (Adv Asim Sarode) यांनी सांगितले.
https://www.instagram.com/p/DATgSDjpGhj
आम्ही अजूनही राज्यात कोठे, किती सभा घ्यायच्या हे नक्की केलेले नाही. पण जनतेतून जो प्रतिसाद येतोय आणि आमच्या सभांची मागणी केली जातेय, हे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लोकांनी पुढाकार घेतला आहे, हे दर्शविणारे आहे, अशी भावना अॅड. सरोदे व डॉ. चौधरी यांनी व्यक्त केली.
https://www.instagram.com/p/DATfFZ2pdbr
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar), नितेश राणे (Nitesh Rane), गिरीश महाजन (Girish Mahajan), सुधीर मूनगंटीवार (Sudhir Mungantiwar), राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe Patil), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), तानाजी सावंत (Tanaji Sawant), धनंजय मुंडे (Dhananjay Munde), शंभुराज देसाई (Shambhuraj Desai), संजय राठोड (Sanjay Rathod), उदय सामंत (Uday Samant) अशा बहुतेक मंत्र्यांच्या मतदारसंघातून निर्भय नागरिक सभांची मागणी केल्याची माहिती उत्पल चंदावर यांनी दिली आहे. (Nirbhay Bano Movement)
https://www.instagram.com/p/DATcbn_pha1
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sharad Pawar On NDA Modi Govt | ‘लोकसभेला मोदी 400 पार सांगत होते,
दिल्लीत त्यांचे सरकार आले नसते पण…’, शरद पवारांचे वक्तव्य; म्हणाले – “सत्तेचा गैरवापर…”