Sharad Pawar On Ajit Pawar | ‘लाडकी बहीण’ वरून शरद पवारांचा अजित पवारांना खोचक टोला; म्हणाले – ‘बारामतीतही एक बहीण निवडणुकीला उभी होती, तेव्हा…’

फलटण: Sharad Pawar On Ajit Pawar | आगामी विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) जोरदार तयारी सुरु आहे. महायुतीकडून (Mahayuti Govt) नवनवीन योजनांची घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारने १ जुलैपासून नवनवीन योजनांचा सपाटा लावला आहे. मागील सव्वा तीन महिन्यांत राज्यातील महायुती सरकारने १ जुलै ते १० ऑक्टोबर या काळात तब्बल ७ हजार ६८० शासन निर्णय काढले आहेत. त्यात महाविद्यालयीन मुलींसह वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक, महिला, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार तरुण- तरुणींसाठीच्या योजनांचा समावेश आहे. (Ladki Bahin Yojana)
https://www.instagram.com/p/DBIp7H-Jvkz
महायुती सरकारने नाराज घटकांना आकर्षित करण्यासाठी तीन महिन्यात तब्बल दीड लाख कोटींच्या नवनवीन योजना जाहीर केल्या आहेत. त्या योजनांची तातडीने अंमलबजावणी सुरु आहे. तर याचा प्रचार- प्रसार करण्यासाठी १० हजाराच्या मानधनावर ५० हजार योजनादूतांची नेमणूक करण्यात आली आहे.
https://www.instagram.com/p/DBIrxfHCRqt
महाविकास आघाडीनेही आगामी विधानसभेसाठी कंबर कसली आहे. दरम्यान शरद पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून अजित पवारांना खोचक टोला लगावला आहे. फलटणमध्ये शरद पवारांनी सभा पार पडली. त्यावेळी सभेला संबोधित करताना त्यांनी अजित पवारांना ‘लाडकी बहीण’ वरुन टोला लगावला आहे.
https://www.instagram.com/p/DBItOhjiizY
शरद पवार म्हणाले, ” आपल्यापुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्र कुणाच्या हातात द्यायचा? सामान्य लोकांच्या हातात महाराष्ट्र द्यायचा की आणखी कुणाच्या हातात द्यायचा? आज सांगितलं जातं की आम्ही नवीन नवीन योजना काढल्या. रोज वर्तमानपत्र उघडलं की नवीन योजना बघायला मिळतात. कधी बहिणीबाबत असतात. कुठल्याही व्यक्तीला बहिणीबाबत आस्था असतेच. बहीण ही कुटुंबातली जिवाभावाची व्यक्ती असतेच.
https://www.instagram.com/p/DBIu730CMbA
बहिणीचा सन्मान केला तर माझ्यासारख्याला, तुम्हाला आणि सगळ्यांना मनापासून आनंद होतो.
पण एक गंमत आहे बघा मागच्या दहा वर्षांत बहीण आठवली नाही.
पाच वर्षे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य होतं तेव्हा बहीण दिसली नाही. नंतरच्या काळात बहीण दिसली नाही. बहीण दिसली कधी? लोकसभेला महाराष्ट्रात ४८ पैकी ३१ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या म्हणून बहीण आठवली. असा टोला शरद पवार यांनी लगावला. (Supriya Sule)
https://www.instagram.com/p/DBI0DLNi9oo
ते पुढे म्हणाले, ” तुमच्यापेक्षा बारामतीकर हुशार आहेत. तिथे एक बहीण उभी होती. ती निवडणुकीला उभी राहिल्यानंतर कुणी काहीही म्हणो बारामतीकर निवडणूक प्रचाराला गेलो की गप्प बसायचे. मी म्हटलं झालं काय? कुणी काही बोलत नाही. मतमोजणी झाली तेव्हा कळलं की १ लाख ६० हजार मतं बहिणीला बारामतीकरांनी दिली. याचा अर्थ हा आहे की लोक राजकारण्यांपेक्षा जास्त शहाणे आहेत.
https://www.instagram.com/p/DBI1tk2pdwu
लोकांना कळतं काय करायचं? कुणासाठी करायचं आणि कधी करायचं. आज महाराष्ट्राची सत्ता कुणाच्या हातात द्यायची त्याचा विचार करण्याची गरज आहे. मी काही निवडणुकीला उभा नाही. १४ वेळा निवडणुकीला सामोरा गेलो. सातवेळा दिल्लीची आणि सातवेळा महाराष्ट्राची. सालगड्याला पण सुट्टी देतात पण मला कुणी सुट्टीच दिली नाही” , असेही शरद पवार यांनी यावेळी म्हंटले.
https://www.instagram.com/p/DBI4DXlCafX
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police Tadipari Action | जबरी चोरी करणार्या सराईत गुंडाला 2 वर्षासाठी केले तडीपार