Manohar Chandrikapure On Ajit Pawar | अजित पवारांनी पाठीत खंजीर खुपसला म्हणत उमेदवारीसाठी मोठी डील झाल्याचा गंभीर आरोप; मनोहर चंद्रिकापुरे यांचं पत्र समाजमाध्यमात व्हायरल

मुंबई: Manohar Chandrikapure On Ajit Pawar | अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघात (Arjuni-Morgaon Assembly Constituency) राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपमधून (BJP) राष्ट्रवादीत (Ajit Pawar NCP) प्रवेश केलेल्या माजी मंत्री राजकुमार बडोलेंना (Rajkumar Badole) अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांनी उमेदवारी दिली आहे. बडोलेंना उमेदवारी देताना अजित पवार यांनी विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे तिकीट कापले आहे.
त्यामुळे संतप्त झालेल्या मनोहर चंद्रिकापुरे यांनी थेट अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवारांनी पाठीत खंजीर खुपसला म्हणत उमेदवारीसाठी मोठी डील झाल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
अजित पवार यांनी विश्वासघात केल्याचे म्हणत चंद्रिकापुरे यांनी एक पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली. यानंतर आता चंद्रिकापुरेंनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे चंद्रिकापुरे हे काँग्रेसमधून निवडणूक लढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
मनोहर चंद्रिकापुरे यांनी पत्रात म्हंटले आहे की, ” आदरणीय अजित दादा नमस्कार, मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा निष्ठावंत व एकनिष्ठ कार्यकर्ता बोलतोय. आज माझं तिकीट कापण्यात आल्याचं समजलं, मुंबईत येऊनही रिकाम्या हाताने परत यावं लागलं, याचं मनापासून दुःख झालंय. दादा, जेव्हा महायुतीत जाण्याचा निर्णय तुम्ही घेतला तेव्हा इच्छा नसतानाही आपल्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेऊन मी आणि माझा मतदारसंघ तुमच्यासोबत राहिला.
आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला, पण तुम्ही माझा विश्वासघात केला. केवळ, माझाच नाही तर माझ्यासह माझ्या अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील लाखो नागरिकांचा हा विश्वासघात आहे. मीच राष्ट्रवादीचा उमेदवार असेन, असं सांगत मी मतदारसंघातील गावं न गावं पिंजून काढली, येथील जनतेला भेटून आपली भूमिका कशी बरोबर आहे, हे समजावलं. पण, ऐनवेळी माझ्याच पाठीत खंजीर खुपसला.
दादा, पाठीत खंजीर खुपसल्याचे वाईट वाटते हो, पण ज्या हातात खंजीर आहे, तो हात आपलाच असल्यावर जास्त वाईट वाटते. दोन दिवसांपूर्वी भाजपचा नेता प्रफुल भाई पटेल यांना भेटला आणि त्यांना पटलं. हे सहजच पटेल असं नक्कीच वाटत नाही, यात मोठी डील झालीय अशीच चर्चा आता मतदारसंघात, जनतेत सुरू आहे.
कालपर्यंत मी भाजपचा निष्ठावंत, कट्टर म्हणणार नेता आज सुमडीत आपल्या पक्षात आला. दादा, नेतेमंडळी पक्ष बदलायला मोकळी असते, पण सतरंज्या उचलणारा कार्यकर्ता एकनिष्ठतेची अग्निपरीक्षा देत असतो. म्हणूनच, आमच्या इथल्या नेत्याची सरड्यासारखी बदललेली भूमिका पाहून वाईट वाटलं. मला आणि माझ्या मतदारसंघातील जनतेलासुद्धा.
उद्याच आजसुद्धा मला माहिती नाही, पण मतदारसंघातील जनता हे विसरणार नाही, हा विश्वासघातकीपणा लक्षात ठेवेल, तुम्हाला कदाचित हे पटलं असेल, पण माझ्या लोकांना हे अजिबात ‘पटेल’ असं नाही. त्यामुळेच याच निवडणुकीत याचा हिशोब होणार आणि जनताच सुफडासाफ करणार.
कारण, आता मी जनतेमध्ये जाऊनच दाद मागणार आहे, आता जनतेलाच विधानसभेचे तिकीट मागणार आहे. अर्जुनी-मोरगाव मतदारसंघाचा, स्वाभिमानी जनसेवक मनोहर चंद्रिकापुरे”, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune PMC News | एसटीपीतील पाणी तळजाई वनविभागाला देता येईल? महापालिकेची वन विभागासोबत चर्चा सुरू