Chhattisgarh Sukma Naxal Encounter | छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत 16 माओवादी ठार, सीआरपीएफ आणि नक्षलवाद्यांत पुन्हा धुमश्चक्री

छत्तीसगड ः Chhattisgarh Sukma Naxal Encounter | छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात माओवादी आणि पोलिसांमध्ये शनिवारी (29 मार्च) सकाळपासून चकमक सुरू आहे. यात 16 माओवादी ठार झाले आहेत. सुकुमा जिल्ह्यातील गोगुंडा उपम्पल्ली जंगल परिसरात चकमक सुरू आहे. सुकमाचे पोलीस अधीक्षक या अभियानाचे नेतृत्व करीत आहेत.
मार्च महिन्यात छत्तीसगड राज्यातील ही चौथी मोठी चकमक आहे. या चकमकीत 16 नक्षलवादी ठार झाले. त्यांचे मृतदेह सापडले आहेत. सीआरपीएफच्या दोन जवानांना किरकोळ जखम झाली आहे. केरलापाल क्षेत्रात नक्षलवादी असल्याचा सूचना 28 मार्चला समजली. त्यानंतर डीआरजी आणि सीआरपीएफ यांच्या दलाने ही संयुक्त कारवाई केली.
थांबून थांबून चकमक सुरूच होती. तर नक्षली मागे जात असल्याचे लक्षात येताच सुरक्षा दलांनी या परिसरात तपास सुरू केला. या ‘सर्चिंग ऑपरेशन’मध्ये आतापर्यंत 16 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. या गोळीबारात दोन जवानांना किरकोळ जखम झाल्याची माहिती पुढे येत आहे. त्यांना उपचारांसाठी तुरूंगात पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, 20 मार्च रोजी नक्षलवादी चकमकीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांनी देश लवकरच नक्षलवाद मुक्त करण्याचे सूतोवाच केला. त्यांनी एक्सवर याविषयीची पोस्ट लिहिली होती. नक्षलवाद मुक्त भारत अभियानात आपल्या जवानांना मोठे यश मिळाली. बीजापूर आणि कांकेर या दोन ठिकाणी दोन सशस्त्र दलांनी केलेल्या ऑपरेशनमध्ये 22 नक्षलवादी ठार झाल्याचे ते म्हणाले. इतक्या सुविधा देऊनही जे नक्षलवादी आत्मसमर्पण करणार नाही, त्यांच्यासाठी झिरो टॉलेरन्सचे धोरण राबवण्यात येईल, असे ते म्हणाले. 31 मार्च 2026 रोजी देश नक्षलवाद मुक्त होईल, असे आश्वासन त्यांनी दिले.